ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
वाल्मिकी धर्म समाजच्या वतीने २५० नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रचा पुढाकार.
आताच शेयर करा
May 9, 2020

वाल्मिकी धर्म समाजच्या वतीने २५० नागरिकांना जीवनावश्यक वस् तूंची मदत. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रचा पुढाकार.

नालासोपारा : टाळेबंदीचे काळात सगळ्यात जास्त गरजेचे आहे ती जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता!

सरकारचे माध्यमातून धान्यपुरवठ्यासाठी नियोजन केले जात आहे.

मात्र अनेकांना या वस्तूं मिळत नाहीत ,असे निदर्शनास आल्यावर नॅशनल युनियन ऑफ जर्नालिसटस् महाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर यांचे मार्गदर्शनाखाली इतर संस्था, व्यक्ती यांचे सहकार्याने मदत केली जात आहे.

एनयुजेएमचे पालघर जिल्हाध्यक्ष विजय देसाई यांचे पुढाकाराने भारतीय वाल्मिकी धर्म समाज महाराष्ट्र ,नालासोपारा संघटनेच्या वतीने पूनम पवन बिडलान यांच्या सहकार्याने गरीब व गरजूंना नालासोपारा येथे मोफत अन्न धान्य वाटप करण्यात आले.

लॉक डाऊन मध्ये घरी बसलेल्यांना नालासोपारा पूर्वेकडील शिर्डी नगर, संयुक्त नगर, समेळ पाडा, आचोळे डोंगरी येथील ज्या नागरिकांचे रेशन कार्ड वर अन्न धान्य मिळत नाही तसेच  ज्या महिलांच्या घरात कमावती व्यक्ती नाही अश्या निराधार महिलांना भारतीय वाल्मिकी धर्म समाज महाराष्ट्र संघटन च्या पालघर जिल्हाध्यक्ष पूनम पवन  बिडलान यांनी  तीनशे  गरजू व निराधार लोकांना ६०० किलो तांदूळ , २०० किलो तुरडाळ आणि २०० किलो गोडतेल यांचे वाटप करण्यात आले.

या कामासाठी एनयुजेएम चे वतीने पूनम बीडलान  यांचे आभार मानण्यात आले.

संबंधित लेख

“ननंद-भावजाई सन्मान सोहळा” ठरला अविस्मरणीय!

नालंदा माहेर वाशिम व आम्रपाली महिला मंडळ चोरवली यांचा उपक्रम महिलांच्या हृदयात जागा करून गेला  नालासोपारा : वाशिम जिल्ह्यातील नालंदा माहेर व...

राज्यस्तरीय लेखन स्पर्धेचे पुरस्कार वितरण संपन्न.

मुंबई : मराठीत युद्धपत्रकारिता रुजवलेले ज्येष्ठ दिवंगत पत्रकार दि. वि.गोखले यांची 102वी जयंती  मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण ...

मंगळवारी  वज्रेश्वरी येथे सत्संग मेळाव्याचे आयोजन.

वज्रेश्वरी :  श्री स्वामी समर्थ सत्संग मेळावा आयोजन समिती मुंबई च्या वतीने मंगळवार, दि. १८ मार्च २०२५  श्री क्षेत्र वज्रेश्वरी, ता. भिवंडी, जि.ठाणे...