ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
रासपच्या मेळाव्याला वसई –पालघर जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते जाणार.
आताच शेयर करा
Aug 20, 2019

रासपच्या मेळाव्याला वसई –पालघर जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते जाणार.
नालासोपारा : राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने मुंबई येथे शिवाजी पार्कवर दि.२५ ऑगस्ट रोजी महामेळावा घेण्यात येणार असून वसई विरार सह पालघर जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे महासचिव तसेच शेळी मेंढी महामंडळ अध्यक्ष (राज्य मंत्री दर्जा )बाळासाहेब दोडतले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महादेव जानकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष अक्कीसागर, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे,प्रमुख उपस्थिती गिरिराज सिंह , केंद्रीय मंत्री पशु संवर्धन , रामदास आठवले केंद्रीय मंत्री सामजिक न्याय मंत्रालय , चंद्रकांत पाटिल , महसूल मंत्री ,
रासप दौंड विधान सभा आमदार राहुल कुल ,व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहे. देशातील उपेक्षित समाजाला अपेक्षित ठिकाणी बसविण्यासाठी व धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यात आणि देशात मोठी चळवळ निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना महादेव जानकर यांनी चौंडी येथे केली. यापूर्वी सत्तेवर असणा-या पक्षांनी धनगर समाजाच्या आरक्षणाकडे कानाडोळा केला. धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महादेव जानकर यांनी राज्यात रान उठवलं.याच संधीचा फायदा घेत भाजपने धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले. यासाठी कायदेशीर लढाई चालू ठेवली आणि याचाच पुढचा भाग हणजे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अनेक योजना समाजाच्या पदरात पाडून घेतल्या. आणि एस.टि.एस .सी . च्या सवलती लागू करून घेतल्या आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटिल यांनी दिली तसेच या महामेळाव्यl करता मुंबई , ठाणे , पालघर, रायगड , तसेच संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून लाखो कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित लेख

राज्यस्तरीय लेखन स्पर्धेचे पुरस्कार वितरण संपन्न.

मुंबई : मराठीत युद्धपत्रकारिता रुजवलेले ज्येष्ठ दिवंगत पत्रकार दि. वि.गोखले यांची 102वी जयंती  मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण ...

मंगळवारी  वज्रेश्वरी येथे सत्संग मेळाव्याचे आयोजन.

वज्रेश्वरी :  श्री स्वामी समर्थ सत्संग मेळावा आयोजन समिती मुंबई च्या वतीने मंगळवार, दि. १८ मार्च २०२५  श्री क्षेत्र वज्रेश्वरी, ता. भिवंडी, जि.ठाणे...

महिला एक शक्ती आहे महिलांनी स्वतःला ओळखायला शिका . पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले महिला एक शक्ती आहे महिलांनी स्वतःला ओळखायला शिका . पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले 

नालासोपारा : वसई विरार महानगरपालिकेने महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला, यावेळी महिलांनी कायद्याचा दुरुपयोग करू नये, योग्य वेळी कायद्याचा वापर...